Showing posts with label marathi nibandh. Show all posts
Showing posts with label marathi nibandh. Show all posts

Thursday, December 29, 2022

प्रजासत्ताक दिन मराठी भाषण माझा भारत महान





छोटे भाषण

माझा भारत महान


मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे.माझा भारत हा प्राचीन देश आहे. त्याचा इतिहास वैभवशाली आहे. प्राचीन काळात भारत समृद्ध व ज्ञानात अग्रेसर होता.

      भारतात भौगोलिक विविधता आहे.भारताच्या तीन बाजूंनी सागर व उत्तरेला उत्तुंग हिमालयाची सीमा आहे. भारतातील हवामान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असल्याने धान्य,फळे, भाज्या, फुले यांच्यात ही विविधता आढळते.

       भारत हा जसा वीरांचा, शूरांचा देश आहे तसाच तो संतांचाही देश आहे.भारतात विविध धर्मांचे लोक राहतात व ते भिन्न भाषा बोलतात.या सर्व भाषातील साहित्य समृद्ध आहे.

         भारताने 150 वर्षे गुलामगिरीत साहिली.तेव्हा एकजूट करून भारतीयांनी लढा दिला व 1947 साली स्वातंत्र्य मिळवले. स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षात भारताने विविध क्षेत्रात विकास साधला. या विशाल देशाला अनेक नैसर्गिक आपत्तींना व मानवनिर्मित संकटांना वेळोवेळी तोंड द्यावे लागले आहे. पण सर्व भारतीय संघटित होऊन मोठ्या जिद्दीने त्यावर मात करतात.

      मनुष्यबळ ही भारताची मोठी शक्ती आहे.त्यामुळे भारत विविध क्षेत्रात सतत प्रगती साधत आहे. आज अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वावलंबी आहे. औद्योगिक, वैज्ञानिक क्षेत्रात जगात अग्रेसर बनला आहे. माझा भारत खरोखर महान आहे.

जय हिंद! जय भारत!

Wednesday, December 28, 2022

सावित्रीबाई फुले मराठी भाषण SAVITRIBAI FULE MARATHI SPEECH





सावित्रीबाई फुले मराठी भाषण 



'जिंदगी एक काँटो का सफर है ।

हौसला उसकी पहचान है ।

रास्तोंपर सभी चलते है ,

पर जो रास्ते बनाए ,

वही इन्सान है ।'



                   भारतीय स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या , भारतीय शिक्षणाची ज्ञानगंगोत्री , क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना सत्यशोधक मार्गात साथ देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन ! 

          तो अठराव्या शतकाचा काल होता.स्त्रियांचे जीवन ' चूल आणि मूल ' या पर्यंतच मर्यादित होते.स्त्रियांनी शिक्षण घेणे समजले जायचे.अशा या अठराव्या शतकात ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाईंचा जन्म झाला व एका नव्या अध्यायास सुरुवात झाली. म्हणूनच तर म्हणतात..

   ' बेटीयाँ सबके नसीब में कहाँ होती है ?

     ' रब को जो घर पसंद आये , 

      वहा बेटीयाँ होती है ।

    परंतु आजचा काल बदलला.पण लोकांची मानसिकता बदलली नाही.आजही आपल्याला म्हणावे लागते , 'बेटी बचावो , बेटी पढाओ ' 

  सावित्रीआई स्वतः शिकल्या आणि त्यांनी मुलीनांही शिकवले.आज बस कंडक्टर पासून तर राष्ट्रपतीपदापर्यंत स्त्रियांनी आपले वर्चस्व गाजवले आहे.पण आज स्त्रिया शिक्षित होऊ शकल्या ते फक्त सावित्रीबाई यांच्यामुळेच .

    शेवटी भारतातल्या सर्व स्त्रियांसाठी एवढेच म्हणेन ....

   ' बोये जाते है बेटे, 

पर उग जाती है बेटीयाँ।

स्कूल जाते है बेटे पर, 

आगे बढ जाती है बेटीयाँ

मेहनत करते है बेटे पर ,

अव्वल आती है बेटीयाँ 

जब रुलाते है खूब बेटे ,

तब हँसाती  है बेटीयाँ 

नाम करे ना करे बेटे ,

पर नाम कमाती है बेटीयाँ 

आशा रहती है बेटो से ,

पर पुरी कर जाती है बेटीयाँ 

एवढे बोलून मी माझे भाषण संपविते.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

Tuesday, December 27, 2022

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन

                                                    



प्रजासत्ताक दिन मराठी भाषण 

२६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन भाषण 

                     15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. इंग्रजांचा युनियन जॅक दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून उतरला. भारताचा तिरंगा अगदी डौलानं, अभिमानाने फडकायला लागला .त्याच वेळी या देशातल्या बुद्धिजीवी, विद्वान लोकांनी एकत्र येऊन एका घटनेची निर्मिती केली. 26 जानेवारी 1950 रोजी या देशाला घटना अर्पण केली. या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद व अशा असंख्य व्यक्तींनी एकत्र येऊन ही घटना देशाला समर्पित केली.

     स्वातंत्र्य, समता, न्यायव्यवस्था ,समाजव्यवस्था या मूलभूत विचारांवर ती घटना देशाला अर्पण केलेली आहे. यामुळे हे राज्य प्रजासत्ताक म्हणून पाहिले जाते. 'प्रजेचे राज्य ,रयतेचे राज्य' अशी संकल्पना आपणास पहावयास मिळते.  देशातील सर्व व्यक्तींना कोठेही राहण्याचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा, त्याच पद्धतीने मूलभूत हक्कांचा, कर्तव्याचा, कार्याचा अधिकार प्रत्येक भारतीयास अर्पण करण्यात आला.

                    घटना अर्पण करत असताना या देशांमध्ये सर्व व्यक्तींना समान अधिकार प्राप्त झालेले आहेत .हा देश लोकशाहीचा स्वीकार करून लोकांचा विकास करणारा देश आहे. हेच प्रजासत्ताक राष्ट्रांवरून आपणास पहावयास मिळते. आपण सर्वांनी या गोष्टीचा स्वीकार करणे गरजेचे आहे. समतेचे ,स्वातंत्र्याचे, समानतेचे विचार आत्मसात करून लोकांना ते स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. 

           'प्रजासत्ताक दिन' हा प्रजेच्या हक्काचे ,कार्याचे, मूलभूत अधिकारांची जाणीव करून देणारा दिवस आहे. आपण या दिनाच्या निमित्ताने सर्वांनी प्रजेच्या कल्याणकारी गोष्टींची जाणीव करून त्याच दिशेने घटनेचा सन्मान करून वाटचाल करणे गरजेचे आहे.

      आपण भारतीय या नात्याने प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण झाल्यानंतर त्या घटनेचा सन्मान करून, आदरपूर्वक स्वीकार गरजेचे आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीरांच्या कार्यांचा आदर्श घेऊन घटनेचा सन्मान करून प्रजासत्ताक राष्ट्र घडवण्यासाठी 26 जानेवारी या दिनाच्या निमित्ताने प्रजेच्या कल्याणासाठी ,प्रजेच्या रक्षणासाठी ,देशाच्या विकासासाठी एकत्र येऊन देश घडवण्यासाठी प्रयत्न करूयात ! 

 धन्यवाद!

Thursday, December 22, 2022

राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्याविषयी भाषण





अध्यक्ष महाशय,

मला भाषण करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या मॅडम......उपस्थित प्रेक्षक,गुरुजनवर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो,

 मी आज छत्रपती शिवरायांच्या मातोश्री आऊसाहेब जिजाबाई यांच्या विषयी चार शब्द बोलणार आहे.

 इसवीसन 1600  साल आठवले की आपल्याला आठवतो तो छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास.पण शिवजन्मापूर्वीचा इतिहास त्याहूनही भयानक होता. तब्बल तीनशे ते साडेतीनशे वर्षे महाराष्ट्र पारतंत्र्यात होता.खरंतर आज आपण खूप सुरक्षित आणि आनंदी जीवन जगत आहे.

 जरा विचार करून बघा. समजा वीज नसती, रस्ते नसते,फोन, मोटारी नसत्या,वर्तमानपत्र नसती, नुसती कल्पना केली तरी आपल्याला ती सहन होणार नाही. पण त्याकाळी हे काही नसताना माणसं जगत होती.

   सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आणि सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत ती राबत होती, झगडत होती,अन्याय आणि अत्याचाराशी परकीय शत्रूंनी आक्रमण केलेल्या भयानकाळी राती इथे थैमान घालत होत्या. अशातच एक मायमाऊली वाट बघत होती या अंधाराला भेदून सर्वदूर महाराष्ट्रात प्रकाशाचे किरण पसरून आनंदाची वीज चमकणाऱ्या तेजस्वी सूर्याची. शत्रूच्या हुकूमशाहीने आणि अत्याचाराने त्रस्त झालेल्या रयतेला सुखी समृद्ध करण्यासाठी. एक भोळी आस लावून ती माय एका प्रखर तेजोमय किरणासाठी आतुरली होती.ती कणखर, निर्भय आणि आशावादी माय म्हणजेच मासाहेब जिजाऊ .

   19 फेब्रुवारी 1630 मध्ये या माय माऊलीच्या पोटी एक तेजस्वी, तेजाळता सूर्य जन्माला आला. त्याच्या तेजाने महाराष्ट्र उजळून निघाला.शिवबाच्या चरणाशी नतमस्तक होण्यासाठी. शिवबाचा चरण स्पर्श घेण्यासाठी वसुंधरा आसुसली होती. त्यांच्या हरहर महादेव गर्जनेने सह्याद्रीचा ऊर अभिमानाने भरून आला होता.

  रयतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारा,परकीयांच्या अन्याय, अत्याचाराला महाराष्ट्रातून जमीनदोस्त करणारा ध्येयवादी महापराक्रमी राजा आई जिजाऊंच्या पोटी जन्माला आला. पण शिवराय असे आपोआपच घडले नाहीत. त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या जिजाऊ साहेब. त्यांची तपस्या त्यांनी झेललेल्या हालपिष्ठा पती महिनो महिने लढाईवर असताना त्यांनी बाल शिवबाचा  सांभाळ केला.

 अहो नुसता सांभाळच केला नाही तर त्यांच्या अनेक गोष्टी पारखत असत. अनेक पराक्रमी महापुरुषांचे चरित्र सांगत त्यांच्या अंगात बळ निर्माण केलं.मन घट्ट बनवलं. शरीर दणकट निगरगट्ट बनवलं.आपली रयत अंधारात आहे.तिच्यावर होणारा अत्याचार, निरपराध लोकांचे जाणारे बळी या सर्व गोष्टींची जिजाऊंनी शिवबाला जाणीव करून दिली आणि रयतेच्या कल्याणासाठी प्राणपणाने झुंजायला शिकवलं. म्हणूनच आई जिजाऊ थोर आहेत.आजच्या भाषेत सांगायचं तर ग्रेट आहेत.

 आजच्या माता बघितल्या तर आपल्याला कळून येईल, मुलाला थोडं खरचटलं तरी त्याला खूप खूप जपतात. पण त्या जिजाऊने राजपुत्र म्हणून त्याला राजवाड्यात जपून ठेवला नाही. तर सामान्य जनतेत मिसळायला शिकवलं.त्यांची सुखदुःख वाटून घ्यायला शिकवलं.म्हणून छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे झाले.खरंच धन्य त्या जिजाऊ साहेब!एवढे बोलून मी थांबतो.


 जय हिंद!जय महाराष्ट्र!

Sunday, October 23, 2022

पंडित जवाहरलाल नेहरू Pandit Jawaharlal Nehru



पंडित जवाहरलाल नेहरू

 Pandit Jawaharlal Nehru 

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान ,मुलांचे आवडते चाचा म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्मदिवस.त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि बालदिनाच्या निमित्ताने कार्यक्रमास उपस्थित असलेले अध्यक्ष महाशय माननीय ....... सर प्रमुख पाहुणे ..... सर आमचे सर्व गुरुजन वर्ग ,समोर उपस्थित असलेले श्रोते आणि माझ्या बालमित्रांनो ......

     ना सुकला गुलाब 

कधीच त्यांच्या रसिकतेचा ,

फुलासारखे जपत मुलांना 

घेतला ध्यास त्यांनी विकासाचा ........

झोकून दिला देह देशासाठी ..

विचार मनात फक्त स्वातंत्र्याचा....

मित्रहो ,मी कुणाबद्दल बोलतोय हे तुमच्या लक्षात आलेच असेल .अहो इंग्रजांच्या वाईट व जाचक हुकुमशाहीचा बिमोड करण्यासाठी अनेकांना लढा द्यावा लागला.असेच एक महान ,थोर व्यक्तिमत्व म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू.गांधीजींसोबत अहिंसेच्या मार्गाने इंग्रज सरकारला धारेवर धरणारे हे थोर नेते.पंडित जवाहरलाल नेहरू म्हटलं ,की प्रथम आठवतात ती गुलाबाची फुलं आणि गुलाबाच्या फुलांप्रमाणे गोंडस आणि निरागस मुलं!नेहरुंना गुलाबाची फुलं आणि फुलांसारखी निरागस मुलं फार आवडत असत.देशाचे उज्ज्वल भविष्य म्हणून मुलांकडे ते मोठ्या आशेने पाहत असत.देशाचे भविष्य ज्यांच्या हाती आहे,त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ,असा त्यांचा ध्यास असायचा.14 नोव्हेंबर 1889 रोजी जन्मलेल्या पंडित नेहरूंनी आपले संपूर्ण आयुष्य देश स्वतंत्र करण्यासाठी आणि स्वतंत्र झालेल्या देशाला प्रगत बनवण्यासाठी खर्ची घातले.

           देश स्वतंत्र करण्यासाठी सत्याग्रह ,अहिंसा ,स्वदेशी,असहकार या मार्गांचा उपयोग करून त्यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा दिला.'सायमन गो बॅक'  म्हणत कॉंग्रेसने सायमन कमिशनला विरोध करत निदर्शने केली.यात पंडित नेहरूही सामील होते.या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या लाठीमारात पंडितजी जखमी झाले.1942 मधील 'चलेजाव आंदोलनात' त्यांनी इंग्रजांना पळताभुई थोडी केली.स्वातंत्र्याच्या वेडाने झपाटलेली भारतीय जनता पाहून इंग्रजांचे धाबे दणाणले .या आंदोलनातील अनेकांना त्यात्यानी तुरुंगात टाकले.पंडित नेहरू तुरुंगात अडकले .देशहिताची कामे करणे अवघड झाले;परंतु ते डगमगले नाहीत.आमचे काहीही होवो;पण तुम्ही देशाच्या स्वातंत्र्याचे कार्य सुरु ठेवा,असा सल्ला त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिला.तुरुंगात असताना स्वस्थ न बसता त्यांनी लेखन केले.भारताच्या इतिहासावरील एक मोठा 'शोधग्रंथ' त्यांनी लिहिला.या ग्रंथाचे नाव होते 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया'.

नेहरू तुरुंगातून सुटले.स्वातंत्र्याचा लढा अधिक तीव्र झाला.स्वातंत्र्याचे महत्व जनतेला पटले होते.या गोऱ्या इंग्रजांना येथून हाकलून द्यायचेच , या एकमेव निर्धाराने जनता पेटून उठली होती.पंडित नेहरूंनी भारताच्या स्वातंत्र्याचा मांडलेला ठराव मंजूर करून घेण्यात आला .भारतीय जनतेचा रोष पाहता इंग्रजांना आता माघार घेण्याशिवाय पर्याय उरला नाही.

15 ऑगस्ट 19 47 साली भारत स्वतंत्र झाला.पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले.स्वतंत्र भारताच्या अनेक समस्या म्हणजेच अज्ञान,बेकारी ,दुष्काळ अशा अनेक प्रश्नांची त्यांनी योग्यप्रकारे हाताळणी करत देशाची वैज्ञानिक प्रगती केली आणि शेतीचा विकास घडवून आणला.

त्यांच्या उदंड कार्याची दाखल घेत 1952 साली त्यांना 'भारतरत्न' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मित्रांनो या थोर नेत्याने आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी वाहिले.27 मे 1964 रोजी ते आपल्यातून निघून गेले.खरे तर आपण आपल्या जीवनात देशहिताचे कार्य करणे ,देशबांधवांच्या हितासाठी कार्यरत राहणे आणि देशाला प्रगतशील बनविण्यात हातभार लावणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल ! 

जय हिंद ,जय भारत ! 







Related Posts

विविध विषयांवरील मराठी भाषणे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


तरुणाईचे प्रेरणास्थान : ए.पी.जे.अब्दुल कलाम


वाचनप्रेरणा दिन  : वाचनाचे महत्व 

 

वाचनप्रेरणा दिन  : वाचनाचे महत्व  Importance of Reading


डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार


डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जीवनपरिचय 

 

शहीद भगतसिंग माहितीपट


महात्मा गांधी मराठी भाषण


लाल बहादूरशास्त्री भाषण


महात्मा गांधी मराठी भाषण


भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान : इंदिरा गांधी


डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जीवनपरिचय १


डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जीवनपरिचय २

14 नोव्हेंबर -बालदिन विशेष माहितीपट - पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जीवनकार्य 


शिक्षकदिन मराठी भाषण


कर्मवीर भाऊराव पाटील मराठी भाषण


सुप्रसिद्ध व्यक्ती व त्यांचे उद्गार


डॉ.एन.डी.पाटील परिचय


सावित्रीबाई फुले मराठी भाषण


महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी भाषण


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार


लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज


छत्रपती शिवाजी महाराज


मराठी राजभाषा दिवस