Showing posts with label लाल बहादूर शास्त्री जयंती भाषण. Show all posts
Showing posts with label लाल बहादूर शास्त्री जयंती भाषण. Show all posts

Tuesday, September 20, 2022

लाल बहादूर शास्त्री मराठी भाषण, Lal Bahadur Shastri Marathi Speech



लाल बहादूर शास्त्री जयंती मराठी भाषण 

आजच्या या शुभ दिवशी लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर भाषण देण्याची संधी मिळाल्याने मी स्वतःला खूप भाग्यवान समजत आहेआणि मला आशा आहे की माझ्या या भाषणातून सर्वांना लाल बहादूर शास्त्रीजींच्या कार्याबद्दल माहिती देऊ शकेल.

         लाल बहादूर शास्त्रीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 ला ब्रिटीश काळात उत्तर प्रदेशातील मुघलसराय येथे झाला होता.ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान झाले होते.सोबतच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते.





        लाल बहादूर शास्त्रीजी गांधीजींच्या साहस व अहिंसेच्या विचारांनी प्रभावित होते.लाल बहादूर शास्त्री यांचे वडील मुन्शी शारदाप्रसाद श्रीवास्तव एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते.त्यांच्या आईचे नाव रामदुलारी होते.शास्त्रीजींच्या जन्माच्या 18 महिन्यानंतरच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.ज्यामुळे त्यांच्या आई त्यांना घेऊन माहेरी आल्या.






       लाल बहादूर शास्त्री यांनी हरिश्चंद्र हायस्कूल आणि काशी विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले.येथूनच त्यांनी संस्कृत भाषेत पदवी पूर्ण करून 'शास्त्री' ही  उपाधी धारण केली .

       भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी 'मरो नाही मारो' ची घोषणा दिली .त्यांच्या या घोषणेमुळे संपूर्ण देशात स्वातंत्र्याची भावना तीव्र झाली.शास्त्री यांनी महात्मा गांधीजींच्या सर्व आंदोलनात सक्रीय पद्धतीने पुढाकार घेतला.1921 मधील असहयोग आंदोलन ,1930 मधील दांडी यात्रा व 1942 मधील 'भारत छोडो आंदोलनात' त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.भारत छोडो आंदोलनात इतर नेत्यांसोबत लाल बहादूर शास्त्री यांनाही इंग्रजांनी अटक केली.






          भारताच्या स्वातंत्र्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांना उत्तर प्रदेशाच्या संसदेचे सचिव बनवण्यात आले.1947 मध्येच त्यांना 'पोलीस आणि वाहतूक मंत्रीही' बनवण्यात आले.त्यांनी पहिल्यांदा बसमध्ये महिला कंडक्टर ची नियुक्ती केली होती.1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्युनंतर त्यांना भारताचे पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले.त्यांनी दुध उत्पादनात वाढ करण्यासाठी 'श्वेतक्रांतीला'ही प्रोत्साहन दिले.भारतात धन्यउत्पादन वाढविण्यासाठी 'हरितक्रांतीला'ही प्रोत्साहन दिले.

       त्यांच्या कार्यकाळात 1965 मध्ये भारताने पाकिस्तानसोबत एक आक्रमणाचा सामना केला.त्यांनी पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यासाठी भारतीय सेनेला स्वतंत्रता दिली आणि देशात अधिक लोकप्रियता मिळवली.23 सप्टेंबर 1965 ला भारत-पाकिस्तान युद्ध समाप्त झाले.






       10 जानेवारी 1966 ला रशिया आणि अमेरिका यांच्या दबावाखाली लाल बहादूर शास्त्री भारत-पाकिस्तान शांती करारारावर स्वाक्षरी करण्यास तयार झाले.पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुब खान आणि भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची भेट रशियातील ताश्कंद येथे झाली.असे म्हटले जाते की त्यांच्यावर दबाव टाकून हस्ताक्षर करण्यास सांगितले गेले.11 जानेवारी 1966 मध्ये कराराच्या रात्री अतिशय रहस्यपूर्ण पद्धतीने त्यांचा मृत्यू झाला.त्यावेळी सांगण्यात आले की त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला.परंतु त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले नाही .






        लाल बहादूर शास्त्री यांनी निस्वार्थपणे देशाची सेवा केली.चला आज आपण सार्वजण मिळून लाल बहादूर शास्त्री यांच्या महान कार्याला अभिवादन करू !

       आज आवश्यकता आहे की,आपल्या देशातील सर्व नेत्यांनी लाल बहादूर शास्त्री यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करायला हवे.असे केल्यास देशाला प्रगतीपथावर पुढे जाण्यास कोणीही रोखू शकत नाही.








  आपण सर्वांनी माझे भाषण शांतचित्ताने ऐकून घेतले त्याबद्दल  धन्यवाद ! 

  जय हिन्द ! जय भारत !

        

    

           महात्मा गांधी जयंती मराठी भाषण