Thursday, December 29, 2022

प्रजासत्ताक दिन मराठी भाषण माझा भारत महान





छोटे भाषण

माझा भारत महान


मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे.माझा भारत हा प्राचीन देश आहे. त्याचा इतिहास वैभवशाली आहे. प्राचीन काळात भारत समृद्ध व ज्ञानात अग्रेसर होता.

      भारतात भौगोलिक विविधता आहे.भारताच्या तीन बाजूंनी सागर व उत्तरेला उत्तुंग हिमालयाची सीमा आहे. भारतातील हवामान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असल्याने धान्य,फळे, भाज्या, फुले यांच्यात ही विविधता आढळते.

       भारत हा जसा वीरांचा, शूरांचा देश आहे तसाच तो संतांचाही देश आहे.भारतात विविध धर्मांचे लोक राहतात व ते भिन्न भाषा बोलतात.या सर्व भाषातील साहित्य समृद्ध आहे.

         भारताने 150 वर्षे गुलामगिरीत साहिली.तेव्हा एकजूट करून भारतीयांनी लढा दिला व 1947 साली स्वातंत्र्य मिळवले. स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षात भारताने विविध क्षेत्रात विकास साधला. या विशाल देशाला अनेक नैसर्गिक आपत्तींना व मानवनिर्मित संकटांना वेळोवेळी तोंड द्यावे लागले आहे. पण सर्व भारतीय संघटित होऊन मोठ्या जिद्दीने त्यावर मात करतात.

      मनुष्यबळ ही भारताची मोठी शक्ती आहे.त्यामुळे भारत विविध क्षेत्रात सतत प्रगती साधत आहे. आज अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वावलंबी आहे. औद्योगिक, वैज्ञानिक क्षेत्रात जगात अग्रेसर बनला आहे. माझा भारत खरोखर महान आहे.

जय हिंद! जय भारत!

Wednesday, December 28, 2022

सावित्रीबाई फुले मराठी भाषण SAVITRIBAI FULE MARATHI SPEECH





सावित्रीबाई फुले मराठी भाषण 



'जिंदगी एक काँटो का सफर है ।

हौसला उसकी पहचान है ।

रास्तोंपर सभी चलते है ,

पर जो रास्ते बनाए ,

वही इन्सान है ।'



                   भारतीय स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या , भारतीय शिक्षणाची ज्ञानगंगोत्री , क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना सत्यशोधक मार्गात साथ देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन ! 

          तो अठराव्या शतकाचा काल होता.स्त्रियांचे जीवन ' चूल आणि मूल ' या पर्यंतच मर्यादित होते.स्त्रियांनी शिक्षण घेणे समजले जायचे.अशा या अठराव्या शतकात ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाईंचा जन्म झाला व एका नव्या अध्यायास सुरुवात झाली. म्हणूनच तर म्हणतात..

   ' बेटीयाँ सबके नसीब में कहाँ होती है ?

     ' रब को जो घर पसंद आये , 

      वहा बेटीयाँ होती है ।

    परंतु आजचा काल बदलला.पण लोकांची मानसिकता बदलली नाही.आजही आपल्याला म्हणावे लागते , 'बेटी बचावो , बेटी पढाओ ' 

  सावित्रीआई स्वतः शिकल्या आणि त्यांनी मुलीनांही शिकवले.आज बस कंडक्टर पासून तर राष्ट्रपतीपदापर्यंत स्त्रियांनी आपले वर्चस्व गाजवले आहे.पण आज स्त्रिया शिक्षित होऊ शकल्या ते फक्त सावित्रीबाई यांच्यामुळेच .

    शेवटी भारतातल्या सर्व स्त्रियांसाठी एवढेच म्हणेन ....

   ' बोये जाते है बेटे, 

पर उग जाती है बेटीयाँ।

स्कूल जाते है बेटे पर, 

आगे बढ जाती है बेटीयाँ

मेहनत करते है बेटे पर ,

अव्वल आती है बेटीयाँ 

जब रुलाते है खूब बेटे ,

तब हँसाती  है बेटीयाँ 

नाम करे ना करे बेटे ,

पर नाम कमाती है बेटीयाँ 

आशा रहती है बेटो से ,

पर पुरी कर जाती है बेटीयाँ 

एवढे बोलून मी माझे भाषण संपविते.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

Tuesday, December 27, 2022

युगपुरुष : स्वामी विवेकानंद मराठी भाषण /निबंध




युगपुरुष : स्वामी विवेकानंद मराठी भाषण / निबंध 

"ज्ञानवंत तू ! कीर्तीवंत तू ! आढळ तुझे स्थान!

तुझ्या पूजनी विनीत होणे,हाच आमचा सन्मान!"

   ज्यांच्या विचारातून अनेक युगायुगांसाठी प्रकाश निर्माण होत राहील,असे स्वामी विवेकानंद हे थोर युगपुरुष होते.

       विवेकानंदांचा जन्म विश्वनाथ दत्त व भुवनेश्वर देवी या दाम्पत्याच्या पोटी 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता शहरात झाला. शालेय जीवनात स्वामीजी अत्यंत बुद्धिमान व प्रतिभावान विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल विचार मंथन चालू असतानाच त्यांची भेट रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली आणि त्यांच्याकडूनच विवेकानंदांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले.

         रामकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांचे पवित्र कार्य पुढे चालवण्याची जबाबदारी विवेकानंदांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलली. कार्याचा प्रचार आणि प्रसार करत त्यांनी भारतभर भ्रमण केले. त्या भ्रमंतीत त्यांना मातृभूमीच्या समस्यांची जाणीव झाली. त्या सोडवण्यासाठी योजनात्मक विचार त्यांनी मांडले.

       1893 मध्ये शिकागो येथे भरलेल्या 'जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये' स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृती व हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीच्या 'माझ्या बंधू आणि भगिनींनो!' या दोनच शब्दांनी संपूर्ण जगाला जिंकले होते. भारतीय तत्त्वज्ञानाच्या किनाऱ्यापासून पाश्चात्यांच्या विज्ञानवादापर्यंत समन्वयाचा खळखळाट करत वाहणाऱ्या त्यांच्या अमोघ वक्तृत्ववाणीने सारे पाश्चात्य देश दिपून गेले.

      पाश्चात्यांना भारतीय तत्त्वज्ञानाची शिकवण देऊन 1897 साली ते भारतात परतले. इंग्लंड मधून निघताना एका इंग्रज मित्राने त्यांना एक प्रश्न केला. विलासाची लीला भूमी असलेली पाश्चात्यभूमी सोडल्यावर चार वर्षांनी आपली मातृभूमी आपणाला कशी वाटेल?त्यावर स्वामीजींनी उत्तर दिले, "पाश्चात्य देशात येण्यापूर्वी मी फक्त भारतभूमीवर प्रेम करत होतो. पण आता भारतातील धुळीचे कण व तेथील हवा देखील मला पावित्र्याने भारलेली वाटेल. कारण आता भारत हा माझ्यासाठी तीर्थ होऊन बसला आहे."

      जेव्हा स्वामी विवेकानंदांनी भारतभूमीत प्रवेश केला तेव्हा तेजाचा दैदिप्यमान पुतळा असलेल्या या महान युगपुरुषाच्या स्वागतासाठी संपूर्ण राष्ट्र उभे राहिले. अवघ्या चाळीस वर्षांच्या मर्यादित आयुष्यात अमर्यादित अशा विचार आणि कर्तृत्वाने त्यांनी भारतीयांच्या समोर एक दीपस्तंभ उभा केला.

        स्वामीजींच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेने सारे जग आश्चर्येचकीत झाले.त्यांच्या अढळ तपस्वीतेतून समाजमनावर आदर्शाचे प्रतिबिंब उमटले.त्यांच्या महान तेजाने सारे जगच दिपून गेले आणि त्यांच्या महान विचारांनी दशदिशाही प्रकाशमान झाल्या.

अशा या युगपुरुषाला विनम्र अभिवादन!





स्वामी विवेकानंद मराठी भाषण Swami Vivekanand Marathi Speech





 स्वामी विवेकानंद मराठी भाषण

 'माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो'असे उद्गार काढून विश्वबंधुतेचे नाते प्रस्थापित करणारे एक थोर भारतीय युगपुरुष स्वामी विवेकानंद यांचे विषयी आज विचार मांडतोय.

    स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 या दिवशी झाला. त्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखत असलो तरी त्यांचे मूळ नाव नरेंद्र असे होते. त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वर देवी व वडिलांचे नाव विश्वनाथबाबू असे होते .कोलकाता शहरातील सिमोलीया भागात मकर संक्रांतीच्या पवित्र सणादिवशी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील वकील होते तर आई भुवनेश्वर देवी हुशार बुद्धिमान व धार्मिक वृत्तीच्या होत्या. अशा मातापित्यांनी नरेंद्र यांना सुसंस्काराचे धडे दिले. ते सर्व प्रकारच्या खेळात तल्लख होते.त्यांची स्मरणशक्ती अजब होती.त्यामुळे ते अभ्यासात हुशार होते.त्यांच्या मनात नेहमी सद्भावना वास करीत होती. त्यांच्या वडिलांनी त्यांना थोर समाज सुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या शाळेत घातले. लहानपणापासून नरेंद्र यांना उत्तम एकाग्रतेची देणगी लाभली होती. त्यामुळे ते कोणताही विषय आत्मसात करीत होते. शालेय अभ्यासात हुशार असल्याने ते मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी आपले नाव दाखल केले. त्यांना सर्वच विषयांमध्ये गोडी होती. ते वाचनालयात जाऊन विविध विषयांचे सखोल वाचन करत असत. त्यांनी पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचे सर्व ग्रंथ वाचून काढले.त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती अधिक चिकित्सक बनली.

   नोव्हेंबर 1880 मध्ये नरेंद्रची ओळख दक्षिणेश्वरात रामकृष्ण परमहंशांशी झाली. त्यांना नरेंद्र यांचे विषयी प्रेम जिव्हाळा आपुलकी निर्माण झाली. ते नरेंद्र यांचे गुरु बनले. त्याचबरोबर परमहंस आणि योग मार्गाचा आपला वसा विवेकानंद यांच्याकडे सोपवला आणि कार्यास प्रारंभ करण्यास सांगितले.

      नरेंद्र यांनी हिंदू धर्म व तत्वज्ञान यांचा सखोल अभ्यास केला.1893 मध्ये त्यांना अमेरिकेतील शिकागो येथे भरणाऱ्या जागतिक सर्वधर्म परिषदेची माहिती कळाली. या संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी नरेंद्र आगबोटीने अमेरिकेला रवाना झाले. सर्व प्रकारे तयारी दर्शवून त्यांनी या परिषदेला जाण्याचा आग्रह दर्शविला आणि या परिषदेत जाण्याचा निश्चय त्यांनी केला. त्यांनी संन्यासाचा स्वीकार अंगीकारला व स्वामी विवेकानंद नाव धारण केले. 31 मे 1893 रोजी शिकागोस गेले. त्या ठिकाणी आलेले जगभरातील नानाधर्मीय लोक स्वामी विवेकानंदांना पाहून प्रभावित झाले आणि याच ठिकाणी त्यांनी 'माझ्या बंधू भगिनींनो' असे उद्गार काढून उपस्थित रसिक श्रोत्यांची मनी जिंकली. त्यांच्या हृदयाची पकड घट्ट केली. त्यांचा संदेश हा नवजीवनाचा संदेश होता.व्याख्याने देत आणि पाश्चात्यांना भारतीय तत्त्वज्ञानाची शिकवण देत ते अमेरिकेत बरेच महिने राहिले. त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये एका धर्माचा दुसऱ्या धर्माशी झगडा असू शकत नाही, सर्वांनी एकजुटीने लढायचे आहे, क्रांती घडवायची आहे, स्नेहबंध निर्माण करणारे उद्गार त्यांनी काढले तसेच त्यांनी या परिषदेमध्ये ओघवत्या भाषेत हिंदू धर्माची श्रेष्ठता सर्वांना पटवून दिली.

        त्यांच्या भाषणामुळे स्वामी विवेकानंद यांची ओळख सर्वांनाच झाली. कोणतीही व्यक्ती त्यांच्याबरोबर मनमोकळेपणाने बोलू शकत होती. एकदा अशीच एक अमेरिकन महिला त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याबरोबर संभाषण करू लागली. बोलता-बोलता विवेकानंद यांना तिने उगीचच खोदून विचारले, " स्वामीजी तुमच्या अंगावरचे कपडे भारतीय असूनही पायातील बूट मात्र परदेशी बनावटीचा आहे हा फरक कसा हो? " स्वामीजींना प्रश्न कळाला होता.त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पिकले.त्यांनी उत्तर दिले, " मी एक संन्याशी.लोकांनी जे प्रेमाने दिले ते मी घेतले. त्यात माझे तुझे असा भेदभाव नाही.मी जोपर्यंत या देशात आहे, त्याचा मी तोपर्यंत आदर्श स्वीकार करेन मात्र येथून निघून जाताना ते येथेच ठेवून जाईन!" बाई अधिक थिजल्या. एवढ्या मोठ्या माणसाला अशा एका क्षुल्लक प्रश्नाच्या मुद्द्यावरून कात्रीत धरण्याचा आपला प्रश्न मूर्खपणाचा होता,याची जाणीव झाल्याने ती क्षणभर नाराज झाली.

      अमेरिकेतील कार्य असे चालू राहील, अशी व्यवस्था करून स्वामीजी इंग्लंडला आले.त्याही ठिकाणी व्याख्याने दिली. इंग्लंडमध्येही त्यांना अनेक सहकारी मिळाले. आपल्या परदेशातील वास्तव्यात स्वामी विवेकानंदांनी आपल्या धर्म,संस्कृतीची पताका पाश्चिमात्य देशात फडकावून हिंदू धर्माचे उज्वल दर्शन घडविले.1896 च्या अखेर स्वामी विवेकानंद भारतात परतले. परदेशातील समृद्धी व सुबत्ता पाहून भारतातील गरिबी व हालाखी अधिक जाणवली.  1897 रोजी त्यांनी रामकृष्ण परिवाराची बैठक बोलावून समाजाच्या उद्धारासाठी एक सेवासेना उभारण्याचे स्वप्न त्यांनी मनी बाळगले होते. हा विचार बैठकीमध्ये मांडला आणि तो सर्वांना मान्य झाला आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. प्रत्येक धर्माच्या अनुयायांमध्ये बंधुभाव उत्पन्न व्हावा यासाठी रामकृष्ण परमहंसानी केलेल्या कार्याची धुरा या मिशनने खंबीरपणे आपल्या खांद्यावर घेतली.राष्ट्राची उभारणी करण्याचे कार्य या मिशनने हाती घेतले.

      राष्ट्र उभारणीचे दिव्य स्वप्न उराशी धरून कार्य करीत असताना स्वामी विवेकानंदांची प्रकृती खालावत चालली होती आणि त्यांना दम्यासारख्या विकाराने पछाडले.अशा परिस्थितीत ही त्यांचे राष्ट्र उभारणीचे व समाज प्रबोधनाच्या विचारांचा प्रसार व प्रचार अखंडपणे चालूच होता. अशा परिस्थितीतच ते पुन्हा 1899 साली परदेशाच्या प्रवासाला निघाले आणि न्यूयॉर्कमध्ये जाऊन त्यांनी वेदांत सोसायटीची स्थापना केली. त्याचबरोबर कॅलिफोर्नियात शांती आश्रमाची स्थापना केली.पॅरिसमधील भरलेल्या धर्म उत्क्रांती परिषदेस ही उपस्थित राहिले आणि ते पुन्हा भारतात परतले आणि याच प्रवासात त्यांना दम्याच्या विकाराबरोबर मधुमेहाचा विकार जडला. मात्र त्यांचे राष्ट्र उभारणीचे कार्य युद्धपातळीवर सुरूच होते. 4 जुलै 1902 रोजी त्यांनी लवकर उठून तीन तास ध्यान केले.काही तास आश्रमवासीयांशी विविध विषयांवर चर्चा केली.नंतर शांतपणे योग मार्गाने त्यांनी देह विसर्जन केले.अवघे 39 वर्षे आयुष्य स्वामी विवेकानंदांना लाभले. मात्र अल्पावधीत त्यांनी केलेले कार्य वाखाण्याजोगे आहे.म्हणून मी राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंदांना अभिवादन करतो. धन्यवाद!







विशेष संवर्ग शिक्षक भाग 2 मधील शिक्षकांनी पसंतीक्रम कसे भरावेत?

जिल्हाअंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया 

संवर्ग -02 मधील शिक्षकांनी शाळांचे पसंतीक्रम कसे भरावेत याबाबत सविस्तर माहिती सांगणारा

VINSYS INFO.PUNE 

यांचा व्हिडीओ.





26 जानेवारी प्रजासत्ताक दिन

                                                    



प्रजासत्ताक दिन मराठी भाषण 

२६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन भाषण 

                     15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. इंग्रजांचा युनियन जॅक दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून उतरला. भारताचा तिरंगा अगदी डौलानं, अभिमानाने फडकायला लागला .त्याच वेळी या देशातल्या बुद्धिजीवी, विद्वान लोकांनी एकत्र येऊन एका घटनेची निर्मिती केली. 26 जानेवारी 1950 रोजी या देशाला घटना अर्पण केली. या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद व अशा असंख्य व्यक्तींनी एकत्र येऊन ही घटना देशाला समर्पित केली.

     स्वातंत्र्य, समता, न्यायव्यवस्था ,समाजव्यवस्था या मूलभूत विचारांवर ती घटना देशाला अर्पण केलेली आहे. यामुळे हे राज्य प्रजासत्ताक म्हणून पाहिले जाते. 'प्रजेचे राज्य ,रयतेचे राज्य' अशी संकल्पना आपणास पहावयास मिळते.  देशातील सर्व व्यक्तींना कोठेही राहण्याचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा, त्याच पद्धतीने मूलभूत हक्कांचा, कर्तव्याचा, कार्याचा अधिकार प्रत्येक भारतीयास अर्पण करण्यात आला.

                    घटना अर्पण करत असताना या देशांमध्ये सर्व व्यक्तींना समान अधिकार प्राप्त झालेले आहेत .हा देश लोकशाहीचा स्वीकार करून लोकांचा विकास करणारा देश आहे. हेच प्रजासत्ताक राष्ट्रांवरून आपणास पहावयास मिळते. आपण सर्वांनी या गोष्टीचा स्वीकार करणे गरजेचे आहे. समतेचे ,स्वातंत्र्याचे, समानतेचे विचार आत्मसात करून लोकांना ते स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. 

           'प्रजासत्ताक दिन' हा प्रजेच्या हक्काचे ,कार्याचे, मूलभूत अधिकारांची जाणीव करून देणारा दिवस आहे. आपण या दिनाच्या निमित्ताने सर्वांनी प्रजेच्या कल्याणकारी गोष्टींची जाणीव करून त्याच दिशेने घटनेचा सन्मान करून वाटचाल करणे गरजेचे आहे.

      आपण भारतीय या नात्याने प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण झाल्यानंतर त्या घटनेचा सन्मान करून, आदरपूर्वक स्वीकार गरजेचे आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीरांच्या कार्यांचा आदर्श घेऊन घटनेचा सन्मान करून प्रजासत्ताक राष्ट्र घडवण्यासाठी 26 जानेवारी या दिनाच्या निमित्ताने प्रजेच्या कल्याणासाठी ,प्रजेच्या रक्षणासाठी ,देशाच्या विकासासाठी एकत्र येऊन देश घडवण्यासाठी प्रयत्न करूयात ! 

 धन्यवाद!

Thursday, December 22, 2022

राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्याविषयी भाषण





अध्यक्ष महाशय,

मला भाषण करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या मॅडम......उपस्थित प्रेक्षक,गुरुजनवर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो,

 मी आज छत्रपती शिवरायांच्या मातोश्री आऊसाहेब जिजाबाई यांच्या विषयी चार शब्द बोलणार आहे.

 इसवीसन 1600  साल आठवले की आपल्याला आठवतो तो छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास.पण शिवजन्मापूर्वीचा इतिहास त्याहूनही भयानक होता. तब्बल तीनशे ते साडेतीनशे वर्षे महाराष्ट्र पारतंत्र्यात होता.खरंतर आज आपण खूप सुरक्षित आणि आनंदी जीवन जगत आहे.

 जरा विचार करून बघा. समजा वीज नसती, रस्ते नसते,फोन, मोटारी नसत्या,वर्तमानपत्र नसती, नुसती कल्पना केली तरी आपल्याला ती सहन होणार नाही. पण त्याकाळी हे काही नसताना माणसं जगत होती.

   सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आणि सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत ती राबत होती, झगडत होती,अन्याय आणि अत्याचाराशी परकीय शत्रूंनी आक्रमण केलेल्या भयानकाळी राती इथे थैमान घालत होत्या. अशातच एक मायमाऊली वाट बघत होती या अंधाराला भेदून सर्वदूर महाराष्ट्रात प्रकाशाचे किरण पसरून आनंदाची वीज चमकणाऱ्या तेजस्वी सूर्याची. शत्रूच्या हुकूमशाहीने आणि अत्याचाराने त्रस्त झालेल्या रयतेला सुखी समृद्ध करण्यासाठी. एक भोळी आस लावून ती माय एका प्रखर तेजोमय किरणासाठी आतुरली होती.ती कणखर, निर्भय आणि आशावादी माय म्हणजेच मासाहेब जिजाऊ .

   19 फेब्रुवारी 1630 मध्ये या माय माऊलीच्या पोटी एक तेजस्वी, तेजाळता सूर्य जन्माला आला. त्याच्या तेजाने महाराष्ट्र उजळून निघाला.शिवबाच्या चरणाशी नतमस्तक होण्यासाठी. शिवबाचा चरण स्पर्श घेण्यासाठी वसुंधरा आसुसली होती. त्यांच्या हरहर महादेव गर्जनेने सह्याद्रीचा ऊर अभिमानाने भरून आला होता.

  रयतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारा,परकीयांच्या अन्याय, अत्याचाराला महाराष्ट्रातून जमीनदोस्त करणारा ध्येयवादी महापराक्रमी राजा आई जिजाऊंच्या पोटी जन्माला आला. पण शिवराय असे आपोआपच घडले नाहीत. त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या जिजाऊ साहेब. त्यांची तपस्या त्यांनी झेललेल्या हालपिष्ठा पती महिनो महिने लढाईवर असताना त्यांनी बाल शिवबाचा  सांभाळ केला.

 अहो नुसता सांभाळच केला नाही तर त्यांच्या अनेक गोष्टी पारखत असत. अनेक पराक्रमी महापुरुषांचे चरित्र सांगत त्यांच्या अंगात बळ निर्माण केलं.मन घट्ट बनवलं. शरीर दणकट निगरगट्ट बनवलं.आपली रयत अंधारात आहे.तिच्यावर होणारा अत्याचार, निरपराध लोकांचे जाणारे बळी या सर्व गोष्टींची जिजाऊंनी शिवबाला जाणीव करून दिली आणि रयतेच्या कल्याणासाठी प्राणपणाने झुंजायला शिकवलं. म्हणूनच आई जिजाऊ थोर आहेत.आजच्या भाषेत सांगायचं तर ग्रेट आहेत.

 आजच्या माता बघितल्या तर आपल्याला कळून येईल, मुलाला थोडं खरचटलं तरी त्याला खूप खूप जपतात. पण त्या जिजाऊने राजपुत्र म्हणून त्याला राजवाड्यात जपून ठेवला नाही. तर सामान्य जनतेत मिसळायला शिकवलं.त्यांची सुखदुःख वाटून घ्यायला शिकवलं.म्हणून छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे झाले.खरंच धन्य त्या जिजाऊ साहेब!एवढे बोलून मी थांबतो.


 जय हिंद!जय महाराष्ट्र!

नाताळ ख्रिसमस मराठी निबंध

 




माझा आवडता सण नाताळ 

मराठी निबंध नाताळ 

ख्रिसमस मराठी निबंध

मित्रांनो, आपल्याला सणाच्या निमित्ताने सुट्टी मिळते ; त्यामुळे आपल्याला सण खूप आवडतात.दिवाळीत मोठी सुट्टी असते, तशीच नाताळातही असते.त्यामुळे आपण नाताळच्या सुट्टीची वाट बघत असतो.नाताळ हा ख्रिश्चनांचा सण आहे. आपला भारत देश सर्वधर्मसमभाव मानणारा देश आहे; त्यामुळे ख्रिश्चन लोक हेदेखील आपले बांधव आहेत.सर्वांनी प्रत्येक धर्माच्या सणाचा आदर केला पाहिजे.त्यांच्या सणाबद्दलही आदर केला पाहिजे.त्यांच्या सणाबद्दलही जाणून घेतले पाहिजे.



  आज मी तुम्हाला ' नाताळ ' या सणाबद्दल माहिती सांगणार आहे. डिसेंबर महिन्यात येणारा हा सण . २५ डिसेंबर हा प्रभू येशूचा जन्मदिवस.याच दिवशी येशूने योहानाकडून बाप्तिस्मा घेतला; म्हणून या दिवशी संध्याकाळी सर्व ख्रिश्चन लोक चर्चमध्ये जातात. त्याला ' ख्रिसमस ईव्ह ' असे म्हणतात.त्या संध्याकाळी चर्चमध्ये जाऊन गाणी म्हणतात.त्या गाण्यांना ' ख्रिसमस कॅरोल्स ' म्हणतात. रात्री बारा वाजता चर्चची घंटा वाजवतात.घरात फरच्या झाडाचा ख्रिसमस ट्री तयार करतात.या झाडाला वेगवेगळ्या वस्तू बांधतात.ह्या वस्तू लहान मुलांना दिल्या जातात.अशी कल्पना केली जाते की , ' सांताक्लॉज ' लहान मुलांना वस्तू भेट म्हणून देतात.लहान मुले त्या दिवशी खूप खुश होतात.



        'गुड फ्रायडे ' या दिवशी प्रभू येशूचे निधन झाले. लोकांचा उद्धार व्हावा, यासाठी येशूने मरण पत्करले, म्हणून या दिवसापासून हा दिवस ' शुभ शुक्रवार' म्हणून ओळखला जातो.येशूची शिकवण ही लोकांचा उद्धार करणारी होती.त्यांनी जे सांगितले , ते कृतीत आणले.त्यांनी इतरांची दुःखे स्वतः सहन करून इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न केला; म्हणूनच येशूचे वधस्तंभावरचे मरण हे लोकांचा उद्धार करणारे ठरले. 



    हा सण आनंदोत्सव साजरा करणारा असतो.लोक एकत्र येऊन खाणे-पिणे, नृत्य या माध्यमातून आनंद व्यक्त करतात, एकमेकांना भेटवस्तू देतात आणि शुभेच्छा संदेश पाठवून एकमेकांना शुभेच्छा देतात. 

  सण कोणताही असो , तो आनंद घेऊनच येतो नि सर्वांना आनंद देतो.  

Wednesday, December 21, 2022

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 18 5th SCHOLARSHIP EXAM GUESS PAPER 18




 नमस्कार विद्यार्थीमित्रांनो , 

आज आपण पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी

 ( साप्ताहिक चाचणी ) - 18 सोडवणार आहोत . 

विषय - मराठी व गणित 

प्रश्न - 25 

गुण - 50 


यापूर्वीच्या सरावचाचण्या सोडवण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा. 





पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी क्र. 18 

5th Scholarship Online Practice Test No. 18 







Tuesday, December 20, 2022

जिल्हाअंतर्गत बदली विशेष संवर्ग भाग -01 शिक्षकांनी पसंतीक्रम कसा भरावा



जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया
विशेष संवर्ग भाग - 01
पसंतीक्रम कसा भरावा ?
सविस्तर पाहा...


 

स्वच्छतेचा महामंत्र देणारे आधुनिक संत संत गाडगेबाबा




 नमस्कार मित्रांनो,

आज आपण 'संत गाडगेबाबा ' यांचे जीवनकार्य व शिकवण पाहुयात.

अध्यक्ष महाशय माननीय.... सर, प्रमुख उपस्थित दर्शविणारे माननीय... सर. सदैव विद्यार्थ्यांना ज्ञानी आणि सुसंस्कृत घडविण्यासाठी झटणारे आमचे गुरुजनवर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो.

आज मी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर भाषण करणार आहे आणि ते आपण शांतपणे ऐकाल यात तीळमात्रही शंका नाही. संत गाडगेबाबा म्हणजे एक थोर समाजसुधारक! संत गाडगेबाबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील एका खेड्यात झाला.

   १८७६ मध्ये जन्मलेल्या गाडगेमहाराजांनी आपले आयुष्य लोकसेवेसाठीच घालवले. त्यांचे बालपणीचे नाव होते डेबू . डेबूच्या वडीलांचे डेबू लहान असतानाच निधन झाले. पित्याचे छत्र हरपले. घरात भयंकर दारिद्रय. अशा अवस्थेत डेबू मामाकडे राहू लागला. घरची व शेतीची कामे करू लागला. डेबू सगळी कामे मन लावून करीत होता; पण अचानक एके दिवशी म्हणजे १९०५ मध्ये आपल्या तरुणपणात डेबू मामाचे घर सोडून निघून गेला. तो पुन्हा कधी घरी परतला नाही. 'हे विश्वची माझे घर' असे म्हणत डेबूने वाट फुटेल तिकडे आपला प्रवास सुरू केला. अंगात फाटकी कपडे, दाढी वाढलेली, हातात एखादी काठी अशा अवस्थेत गावोगावी फिरत राहिला. एखाद्या गावात जाऊन दिवसभर गावातले रस्ते, चौक झाडून साफ करायचा: कुणाची लाकडे तोडून द्यायची. कुणी भाकरी-कालवण दिले तर तेच खाऊन पोटाची खळगी भरायची, असा दिनक्रम सुरू झाला, साफसफाई करताना कुणी विचारले तर सांगायचा, की “आज गावात संध्याकाळी कीर्तन आहे."

देवळाच्या पाटावर सगळे लोक जमा व्हायचे; पण त्यांना कुणी बुवा दिसायचे नाहीत. मग सारा गाव जमा झाला , की संत गाडगेबाबा स्वतःच हातात खापरं घेऊन कीर्तनाला सुरुवात करायचे. 'गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला. 'आपल्या सुमधुर आवाजात ते कीर्तनात लोकांनी सामील करून घ्यायचे. समाजातील वाईट चालीरिती, अंधश्रद्धा आणि स्वच्छता या विषयांवर गाडगेबाबा कीर्तन करीत असत.गावातील लोक त्यांची वाणी ऐकून आणि प्रबोधनात्मक भाष्य ऐकून एकदम तल्लीन होऊन जात. लोकांच्या, उद्धारासाठी अंधश्रद्धेवर फटकारे ओढत त्यांनी लोकांना स्वच्छतेचंही महत्त्व पटवून दिलं. स्वतःच हातात झाडू घेऊन त्यांनी गावंच्या गावं स्वच्छ केली. त्याचबरोबर लोकांची मनेदेखील स्वच्छ केली.

संत गाडगेबाबाचे कार्य चालूच होते. आज या गावात, तर उद्या त्या गावात. त्यांचे कीर्तन ऐकून मोठे-धनाढ्य लोक त्यांच्या चरणाशी नतमस्तक होत. अनेकांनी त्यांना पैसे देऊ केले; पण त्यांनी एका पैशालाही हात न लावता गोरगरिबांच्या कल्याणासाठी वापरा, असा सल्ला दिला. याच दानशूर व्यक्तींच्या साहाय्याने बाबांनी अनेक धर्मशाळा उभ्या केल्या. रोगी-महारोगी यांच्यासाठी दवाखाने, अस्पृश्यांसाठी वसतिगृहे, कन्या शाळा अशी विधायक कामेही संत गाडगेबाबांनी केली.

मित्रांनो, संत गाडगेबाबा बुद्धिवादी व समाजहित बघणारे आधुनिक संत होते. त्यांनी समाजाला कानमंत्र दिला, तो म्हणजे असा, की खोटेपणाने वागू नका, फुकटचे खाऊ नका, व्यसनापासून दूर रहा, अस्पृश्यता, अंधश्रद्धा बाळगू नका आणि. मुलांना शिक्षण द्या. स्वतः वैराग्याचे रूप घेऊन संबंध मानवजातीला चांगुलपणाची शिकवण देणारा असा संत विरळच. संत गाडगेबाबांना त्रिवार अभिवादन. एवढे बोलून मी थांबतो.

जय हिंद, जय भारत !

Friday, December 16, 2022

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेतील अत्युत्कृष्ट कामाबद्दल आगाऊ वेतनवाढ शासननिर्णय





 शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेतील अत्युत्कृष्ट कामाबद्दल दिनांक ०१.१०.२००६ ते ०१.१०.२००८ मधील आगाऊ वेतनवाढींची रक्कम अदा करण्याबाबत.


महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग


शासन निर्णय क्र : न्यायाप्र-२५२१/प्र.क्र.३५/का-८ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक : १५ डिसेंबर, २०२२.

वाचा-१. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक आवेवा २००६/प्र.क्र.२०८/०६/

आठ दिनांक १४.१२.२००६. २. शासन निर्णय, वित्त विभाग क्र. वेपुर- १२०९/प्र.क्र.२०/सेवा-९ दिनांक २७.०२.२००९.

३. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. आवेवा-१००९/प्र.क्र.८७/०९/आठ दिनांक ०३.०७.२००९.

४. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र. • आवेवा-२००९/प्र.क्र.४६/का.०८. दिनांक २४.०८.२०१७.

4. . रिट पिटीशन क्रमांक ११००४/२०१९ मधील मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांचे

आदेश दिनांक ०५.०९.२०१९


प्रस्तावना :-


शासन सेवेत असताना अत्युत्कृष्ट कामगिरी बजावणा-या शासकीय कर्मचा-यांना त्यांच्या गोपनीय अहवालाची प्रतवारी विचारात घेऊन दोन अथवा एक आगाऊ वेतनवाढी देण्याची योजना अस्तित्वात होती. सदर योजनेच्या कार्यपध्दतीच्या विविध तरतूदी एकत्रित करण्याच्या उद्देशाने दिनांक १४.१२.२००६ नुसार शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले.


राज्य वेतन सुधारणा समितीने, सहावा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा अहवाल दि.२०.१२.२००८ रोजी शासनास सादर केला होता. सदर अहवालातील परिच्छेद ३.२४ नुसार पीबी-४ व्यतिरिक्त इतर वेतनबँड मधील ५ टक्के अधिकारी/कर्मचा-यांना अत्युत्कृष्ट कामासाठी ३ टक्के या साधारण दराने देण्यात येणा-या वेतनवाढीऐवजी ४ टक्के दराने वेतनवाढ मंजूर करावी. अशी वेतनवाढ संबंधित कर्मचा-यांना ५ वर्षातून एकदा मंजूर करावी. यापुढे वरीलप्रमाणे उच्च दराने वेतनवाढ मंजूर करण्यात येणार असल्यामुळे सध्याची एक किंवा २ आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्याची पध्दती बंद करण्यात यावी. या संबंधात सामान्य प्रशासन विभागाने स्वतंत्रपणे कार्यवाही करावी अशी शिफारस समितीने केली होती.


संदर्भाधीन क्र. २ येथील दिनांक २७.२.२००९ च्या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच दिनांक १.१.२००६ पासून सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला. सदर शासन निर्णय निर्गमित होईपर्यंत सहाव्या वेतन आयोगाच्या कालावधीत म्हणजेच सन २००६. २००७ व २००८ या वर्षांमध्ये अत्युत्कृष्ट कामासाठी पात्र कर्मचा-यांना आगाऊ वेतनवाढीचे लाभ काही आस्थापनांनी दिले होते. अशा पात्र कर्मचा-यांना पाचव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार आगाऊ वेतनवाढी देण्यात आल्या होत्या.


आगाऊ वेतनवाढी बाबत समितीच्या शिफारशीनुसार निर्णय घेण्यास काही कालावधी लागणार असल्याने दि.०१.१०.२००६, ०१.१०.२००७ व ०१.१०.२००८ रोजी देय होणा-या आगाऊ वेतनवाढी ज्या अधिकारी कर्मचा-यांना मंजूर करण्यात आल्या असतील अशा कर्मचा-यांची वेतननिश्चिती तात्पुरत्या स्वरुपात आगाऊ वेतनवाढी शिवाय करण्यात यावी असा निर्णय संदर्भाधीन क्रमांक ३ येथील दि.०३.०७.२००९ च्या शासन परिपत्रकान्वये घेण्यात आला होता.

आगाऊ वेतनवाढ ही भविष्यात काम करण्यासाठी प्रोत्साहनादाखल देण्यात येते. ६ व्या वेतन आयोगाचा १० वर्षांचा कालावधी ( दिनांक ०१.०१.२००६ ते ०१.१२.२०१५) हा संपलेला होता. त्यामुळे ६ व्या वेतन आयोगासाठी प्रस्तावित आगाऊ वेतनवाढ धोरण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून आगाऊ वेतनवाढीचा लाभ देणे व्यवहार्य नव्हते. त्या कालावधीकरीता आगाऊ वेतनवाढ धोरणाचा हेतू कालबाहय झाल्याने सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी अनुज्ञेय झाल्याच्या कालावधीत (दि.०१.१०.२००६ ते ०१.१०.२०१५) आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्यात येऊ नये असा निर्णय सदर्भाधीन क्र.४ येथील दिनांक २४.०८.२०१७ च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला.


सदर निर्णयामुळे ज्या कर्मचा-यांना पाचव्या वेतन आयोगानुसार दि.१.१०.२००६,१.१०.२००७ व १.१०.२००८ रोजी आगाऊ वेतनवाढीचे लाभ देण्यात आले होते त्या कर्मचा-यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती करताना दि.०३.०७.२००९ च्या परिपत्रकाच्या सुचनांमुळे दिलेल्या लाभाची रक्कम वसुल केली गेली. अशा प्रकारे आगाऊ वेतनवाढीची वसुली झालेल्या तसेच आवश्यक लामांचे प्रदान न झालेल्या काही कर्मचाऱ्यांनी शासनाच्या दि. २४.८.२०१७ च्या शासन निर्णयाविरोधात विविध न्यायालयांमध्ये याचिका दाखल केल्या होत्या. अशाच याचिकांमधील याचिका क्र. ११००४/२०१९ मध्ये मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांनी दि.०५.०९.२०२२ रोजी खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.


The Government Resolution dated 24.8.2017 will have prospective effect and not retrospective and if benefit was accorded to petitioners of excellent work in the year 2006, 2007 and 2008, shall not be withdrawn and if any recovery is made pursuant to the same, same shall be refunded to the petitioners


मुळ याचिका क्र. ११००४/२०१९ च्या निकालाच्या अनुषंगाने अवमान याचिका क्र. १७५/२०२२ मा.


औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली. सदर याचिकेची सुनावणी दिनांक ०८.०९.२०२२ रोजी झाली. सुनावणीच्या वेळी मुळ याचिकेतील आदेशावर स्थगिती अथवा आदेशाच्या अमलबजावणी संबंधी दिनांक ३१.१२.२०२२ पर्यंत शासनाने निर्णय घेण्याबाबत मा. न्यायालयाने निर्देशित केले. त्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयास अनुसरून सन २००६, २००७ व २००८ या कालावधीतील वसूल करण्यात आलेली अथवा प्रदान न करण्यात आलेली अनुज्ञेय आगाऊ वेतनवाढीची रक्कम परत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय


मा. उच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयास अनुसरून शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेतील अत्युत्कृष्ट कामाबद्दल दिनांक ०१.१०.२००६ ते ०१.१०.२००८ मधील आगाऊ वेतनवाढीची वसूल करण्यात आलेली अथवा प्रदान न करण्यात आलेली अनुज्ञेय आगाऊ वेतनवाढीची रक्कम अदा करण्याच्या अनुषंगाने खालील निर्णय घेण्यात येत आहे.


१. शासकीय सेवेतील अत्युत्कृष्ट कामासाठी ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना सन २००६ २००७ २००८ मध्ये पाचव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार प्रत्यक्षात आगाऊ वेतनवाढी अदा करण्यात आल्या होत्या तथापि, दि.०३.०७.२००९ च्या शासन परिपत्रकानुसार, सहाव्या वेतन आयोगाची वेतननिश्चिती करताना सदर आगाऊ वेतनवाढी विचारात घेतल्या नाहीत, त्यामुळे ५ व्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीनुसार अनुज्ञेय झालेल्या आगाऊ वेतनवाढीच्या रकमा समायोजित झाल्या आहेत. ही बाब विचारात घेता ५ व्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार दि.०१.१०.२००६, दि.०१.१०.२००७ व दि.०१.१०.२००८ रोजी आगाऊ वेतनवाढीच्या अनुषंगाने मंजूर करण्यात आलेली तथापि, दि.०३.०७.२००९ च्या शासन परिपत्रकानुसार ६ व्या वेतन आयोगातील वेतननिश्चिती करताना समायोजित झाल्यामुळे वसुल झालेली आगाऊ वेतनवाढीची रक्कम संबंधितांना ठोक स्वरुपात अदा करण्यात यावी.


शासकीय सेवेतील अत्युत्कृष्ट कामासाठी ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना सन २००६, २००७ व २००८ करिता पाचव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्यात आल्या होत्या. तथापि, संदर्भाधीन दि.०३.०७.२००९ च्या शासन परिपत्रक व दि. २४.८.२०१७ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने ५ व्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीनुसार प्रत्यक्ष लाभ अदा करण्यात आलेले नाहीत, अशा कर्मचा-यांना ५ व्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार दि.१.१०.२००६ १.१०.२००७ व १.१०.२००८ रोजी देय होणा-या आगाऊ वेतनवाढीपोटी अनुज्ञेय रक्कम ठोक स्वरुपात अदा करण्यात यावी. याप्रमाणे लाभ प्रदान करताना संबंधित आगाऊ वेतनवाढीचे आदेश हे आगाऊ वेतनवाढीकरीता शिफारस करण्यासाठी तत्कालीन गठीत समितीच्या मंजूरीअंती निर्गमित करण्यात आले होते याची खात्री करुनच लाभ अदा करण्याची दक्षता घेण्यात यावी.


०३. उपरोक्त बाब क्र. १ व २ मुळे राज्य शासकीय कर्मचा-यांची दिनांक १ जानेवारी, २००६ पासूनची ६ व्या वेतन आयोगानुसार शासननिर्णय दिनांक ३.७.२००९ नुसार केलेल्या सुधारित वेतनश्रेणीतील वेतननिश्चितीत कोणताही बदल होणार नसून ती अंतिम राहील.


सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२१२१५१७२८३३५३०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने LEENA ASHISHE


SANKHE


(लिना संखे)


उप सचिव, महाराष्ट्र शासन

Wednesday, December 14, 2022

मराठी मुळाक्षरांचे लेखन कसे करावे ?

नमस्कार मित्रांनो,

या पोस्टमध्ये,आपण पाहणार आहोत मराठी मुळाक्षरांचे लेखन कसे करावे?

आपल्याला हे व्हिडीओज नक्की आवडतील.

अधिक शैक्षणिक व्हिडीओज साठी Scholar Education हे YouTube Channel Subscribe करा.


चित्रमय मराठी मुळाक्षरे 





चला लिहूया मुळाक्षरे 








चला लिहूया मुळाक्षरे 







चला लिहूया मुळाक्षरे 





                    चला लिहूया मुळाक्षरे ..




                        चला लिहूया मुळाक्षरे ..






                        चला लिहूया मुळाक्षरे ..





चला लिहूया मुळाक्षरे 





चला लिहूया मुळाक्षरे 







चला लिहूया मुळाक्षरे 






चला लिहूया मुळाक्षरे 






Subscribe Our YouTube Channel 

Friday, December 9, 2022

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच 17 5TH STANDARD SCHOLARSHIP GUESS PAPER

 




5th Standard Scholarship Exam Guess Paper
 All Test are here.
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा 
सर्व सराव चाचण्या सोडवण्यासाठी 
खालील चित्रावर क्लिक करा.
 







अधिक सरावासाठी 
YOUTUBE वरील व्हिडिओ येथे पाहा.




पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच 17
 5TH STANDARD SCHOLARSHIP
 GUESS PAPER 17 









Thursday, December 8, 2022

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच 16 5TH STANDARD SCHOLARSHIP GUESS PAPER 16

 









इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सर्व चाचण्या सोडवण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.










YOUTUBE वरील व्हिडिओ येथे पहा.





   पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच 16  

   5TH STANDARD SCHOLARSHIP

 GUESS PAPER - 16 

Subject - English 

येथे सोडवा .


Friday, December 2, 2022

चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव संच 07 4th Standard Talent Search Exam Guess Paper

 




4th Standard Talent Search Exam Guess Paper 
चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव संच - 07 


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

 आज आपण पाहणार आहोत , भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार .